चिकित्सेचं 'प्रश्नचिन्ह' आणि अंधभक्तीचे पूर्णविराम
छायाचित्र सौ.- एबीपी माझा विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने राजकीय व्यासपीठांवर पुन्हा एकदा मतामतांचा धुरळा उडाला. एबीपी माझा या वाहिनीने 'सावरकर...नायक की खलनायक?' या चर्चेचं आयोजन केलं आणि एका नव्या सामाजिक माध्यमवादाला तोंड फुटलं. फेसबुकवर मोठ्यामोठ्या पोस्टी पडल्या, एबीपी माझावर टीकेची झोड उठली आणि त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची जणू मोहीमच सुरू झाली. याची वाहिनीने थोड्या जास्तच गंभीरतेने दखल घेतली आणि सारवासारव करण्याच्या हेतूने की काय, लगेचच 'आम्ही सावरकरप्रेमी बोलतोय...' असा एक कार्यक्रम घेतला. आता या शीर्षकाचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय'शी असणारं साधर्म्य हा निव्वळ योगायोग समजावा का? हा प्रश्न निराळा. पहिला मुद्दा, कार्यक्रमाचं नाव, ज्यावर 'तुम्ही सावरकरांना खलनायक म्हणताच कसे?' असा प्रश्न उपस्थित केला गेला. सावरकरांनी अंदमानात फिरवलेला कोलू, देशासाठी केलेला त्याग वगैरे गोष्टी आळवल्या गेल्या. यातल्या प्रत्येकाच्या खोलात आत्ता जाण्यात काही अर्थ नाही, कारण आजचा विषय वेगळा आहे. तर, कार्यक्रमाचं नाव. काय आहे हे ...